नारायणगाव : (प्रतिनिधी) हॉटेलला जेवायला थांबताना गाडीचा दरवाजा बंद न केल्यामुळे राजगुरूनगर येथील भाजीपाला व्यापारी कैलास मधुकर गोगावले( वय ४५) यांची पाच लाख रुपयांची रोख रक्कम असलेली पिशवी आज्ञात चोरट्यांनी त्यांच्या मोटारीतून चोरून नेली. दरम्यान गाडी गाडी लॉक न केल्याचा फायदा या चोट्याने घेतला असून हा चोरटा हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याची माहिती मिळत आहे. संबंधित व्यापारी जेवायला गेल्यानंतर काही वेळातच चोरटा त्याच गाडी जवळ येतो आणि गाडीतील पैसे लंपास कसा करू शकतो ? या चोरीत गाडी चालकाचा हात तर नाही ना? असा संशय देखील व्यक्त केला जात आहे. ही घटना शुक्रवारी (ता. 18 रात्री आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास नारायणगाव येथील निलायम हॉटेलच्या पार्किंग मध्ये घडली. या प्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यापारी कैलास गोगावले यांचा भाजीपाला खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. शुक्रवारी(ता. 18) दुपारी दोन वाजता गोगावले हे टिंबर मार्केट येथील व्यापाऱ्याकडे उधारीचे पैसे आणण्यासाठी गेले. तेथील व्यापाऱ्यांकडून दहा लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन ते खेड येथील बाजार समितीच्या आवारात आले.यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मित्र सचिन सुरेश खंडागळे (रा. राजगुरूनगर, थिगळस्थळ ता. खेड) हे होते. राजगुरुनगर येथील बाजार समितीच्या आवारातून शेतकऱ्यांच्या भाजीपाला खरेदीची बिल घेऊन ते जुन्नर येथे आले. सावरगाव(ता. जुन्नर) येथील शेतकरी ज्ञानेश्वर लहु पाबळे यांच्याकडे पाच लाख रुपयांची रोख रक्कम दिली. उर्वरित पाच लाख रुपयांची रक्कम घेऊन खेड येथे जाण्यासाठी निघाले. दरम्यान रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नारायणगाव येथील पुणे नाशिक महामार्गा लगत असलेल्या हॉटेल निलायम येथे जेवण्यासाठी थांबले. त्यांनी त्यांची मोटार पार्किंग करताना पैसे असलेली पिशवी शीट खाली ठेवली. नऊ वाजण्याच्या सुमारास जेवण करून आल्यानंतर मोटारीतील पैसे असलेले पिशवी चोरीला गेली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.