ओझर (प्रतिनिधी )जुन्नर तालुक्यामध्ये उन्हाळी बाजरी काढणी सुरु झाली असून मळणी करण्यास अनेक ठिकाणी सुरुवात झाली आहे.दरवर्षी मे महिना आला की बाजरी पीक काढणी सुरुवात होत असते. परंतु यावर्षी अवकाळी पावसामुळे धास्तावलेला शेतकरीच्या मनाची दिव्ध अवस्था झाली असून, बाजरी पीक परीपक्व होण्याच्या आधी काढणी करावी लागत आहे. जुन्नर तालुक्यामध्ये ह्या वर्षी बाजरी पीक, खूप कमी प्रमाणात पेरणी झालेली आहे .असे शेतकरी संतोष शिर्के यांनी सांगितले. ह्यावर्षी बाजरी पिकाचे उत्पादन जरी चांगले असले तरी, पेरणीही अत्यल्प प्रमाणात झाली आहे ,कारण गेल्या तीन वर्षापासून बाजरीचे बाजार वाढलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्याला बारी पीक करायला परवडत नाही, असे संतोष शिर्के यांनी सांगितले .सध्याच्या हंगामामध्ये एका पिशवीला, दहा ते बारा पोती बाजरी चे उत्पादन निघते. तसेच बाजरी ही राखण करावा द्यावी लागते. कारण की पाखरांसाठी ,फळझाडे ही अत्यल्प प्रमाणात राहिली आहेत. त्यामुळे बाजरी च्या पिकावर पक्षांचे बसण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे बाजरी पीक हे वाट्याने राखण कराच द्यावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातामध्ये धान्य व वैरण शिल्लक राहते .शेतकरी हा मुख्यत्व वैरनीसाठी बाजरी करत असतो. असे शेतकरी संतोष शिर्के यांनी सांगितले.